महाराष्ट्रातील शेतकर्यांना खुश खबर पिक विमा मंजूर !!!!
अगोदर कोरडा दुष्काळ आणि शेवटी जास्त प्रमाणात झालेल्या पावसाने भरडलेल्या राज्यातील शेतकर्यासाठी खुश खबर आहे. शासनाने खरीप २०१९ हंगामातील सोयाबीन या पिकासाठी पिक विमा मंजूर केला आहे हा पिक विमा शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत.
सोयाबीन पिक विमा कसा ठरवला आहे?
पिक कापणी प्रयोग झाल्यानंतर ऑक्टोंबर आणि नोहेंबर २०१९ मध्ये झालेल्या आवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे काढणी चालू असताना आणि काढणी झ्ल्यानंतर भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. पिक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या उत्पन्न उंबरठा उत्प्दानापेक्ष्य जास्त दिसून येत आसल्याने काढणी पश्यात नुकसान असून देखील नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्या असमर्थता दाखवत होत्या. परंतु शेतकर्याकढून होत असलेल्या मागणीला फळ मिळाले आहे आसे म्हणावे लागेल.
सोयाबीन पिक विमा किती मंजूर झाला?
शेतकार्याकढून सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे म्हणून प्रती हेक्टर २० ते २५ हजार रुपयाची मागणी होती परंतु विमा कंपन्यांनी नुकसानीच्या ३० टक्के म्हणजे १२५०० सरार्सरी प्रमाणे विमा शेतकऱ्याच्या बँक ख्त्याम्ध्ये जमा होत आहे.