निर्मला सीतारमण यांची 170000 कोटी पॅकेजची घोषणा केली आहे.
*कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे. देशातील प्रत्येक गरिबापर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही त्या बोलताना म्हणाल्या.
*आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.
*गरजूंच्या थेट
खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत
पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
*जनधन
योजनेतंर्गत महिलांच्या खात्यामध्ये पुढील तीन महिने पाचशे रुपये टाकणार, उज्वला
योजना अंतर्गत पुढील तीन महिने मोफत सिलेंडर देण्यात येणार, तर वयोवृद्ध, विधवा,
अपंग व्यक्तींना पुढील तीन महिने एक हजार रुपये देण्यात येणार
*देशातील
8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार
*ज्या
कंपनीत कमाल 100 कर्मचारी आहेत अशाच कंपनीतील 15 हजारांपेक्षा कमी पगार
असणाऱ्यांचा पी एफ पुढील तीन महिने सरकार भरणार
*कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर देशभरात टोल माफी, टोलमाफीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश.

Garib molmajuri karun jivan jagto
उत्तर द्याहटवाकशाला खोटे बोलतात गरीबाला आशा दाखवतात
हटवाकशाला खोटे बोलतात गरीबाला आशेला लावतात
उत्तर द्याहटवा